भांडण प्रत्येक नात्यातला एक नकोसा पण अविभाज्य भाग! त्यात ते नातं... त्याचं आणि त्याच्या तिचं असेल तर मग विचारायलाच नको! एकमेकांच्या असण्याने जी गम्मत येते , त्याचाच एक भाग म्हणजे, ही भांडणं !!
तुझ्या अन माझ्या पत्रिकेतले, जमतच नसतील कुठलेच गुण,
प्रत्येक discussion चा शेवट होतो, म्हणूनच कडाक्याच्या भांडणातून!
कारण अगदी कोणताही चालतं, कधी माझा ड्रेस नवीन आणलेला,
कधी माझी आवडती serial, किंवा कधी स्वयंपाक थंड झालेला...
कधी झालेला तुला उशीर, कधी न सांगता येणं लवकर,
कधी न उचललेला माझा कॉल, कधी sms ला न दिलेलं उत्तर !!
दोघं तोंड फिरवून झोपतो मग, अगदी विरुद्ध दिशांना बघत...
झोपतो कसले तेव्हा, रुसूनच बसायचं क्षण क्षण जागत!!
अशातच मग एकाने टाकायची शस्त्र, सोडून बघायचा अबोला,
मस्तपैकी चहा घेऊन खिडकीशी, "ये ना" म्हणायचा चहा घ्यायला!
खिदळत हसत मग, चहा बरोबर भांडण पण टाकायचं पिऊन,
आणि मग म्हणायचं चला आता झोपायला, हातात हात घेऊन!
त्यातच करायचा दिवा कोणी बंद, यावर परत discussion निघतं
तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून जगवेना, तेव्हा अगदी पक्कं पटतं
छान आहे गं कविता...लिहीत रहा असच
ReplyDeletetrips laii bharii.. ekdam mast lihile ahe.. keep it up.. asha khup kavita havyat amhala.. so ajun lihit raha..
ReplyDeleteGreat dear... Please continue the same.
ReplyDeleteThe way you express through these words are really touchy and awesome....
God bless you...
khupach chhan... agdi nav ani fresh...asach chhan chhan lihit raha...
ReplyDeletetrupti...